पोस्ट्स

प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या शुभहस्ते खंडकरी शेतकऱ्यांना एक एकरपर्यंत जमिनींचे वाटप

इमेज
  ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे व भानुदास सालगुडे पाटील यांच्या अथक परिश्रमाला यश ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांनी खंडकरी शेतकऱ्यांसाठी केलेले काम, फलटण-पंढरपूर रेल्वे, पालखी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न, एमआयडीसी आदि कामे केली आहेत. त्यांची ही कामे व संघर्ष पाहून त्यांना नुकतेच दिल्ली येथे आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशनने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय भारत भूषण पुरस्काराने सन्मानित आहे. अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): महाराष्ट्रात शेती महामंडळाच्या २७ हजार एकर जमिनींचे वाटप झाले असून माळशिरस तालुक्यात ६ हजार एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून एक एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जमिनींचे वाटप प्रलंबित होते, कारण तशी तरतूद नव्हती. परंतु खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे व भानुदास सालगुडे पाटील यांनी याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा करून ज्यांचे एक एकरपेक्षा कमी क्षेत्र आहे अशा खंडकरी शेतकऱ्यांनाही शेती महामंडळाची जमीन मिळवून दिली आहे. यासाठी प्रांत अधिकारी विजया पांगारकर यांनीही सदरच्या फाईलींचा अत्यंत जलद गतीने निपटारा केल्यामुळे या लढ्याला लवकरच यश...

पुणे महानगपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे व संबंधित दोषींची सीबीआय व ईडीमार्फत चौकशी होऊन बदली व्हावी (कामगार विभाग भाग -१)

इमेज
 पुणे (बंडखोर वृत्तसेवा):  पुणे महानगरपालिकेतील कामगार कल्याण विभागाने अंदाजे तीन हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा संशय आहे. तसेच शिवाजी दौंडकर मुख्य कामगार अधिकारी, नितीन केंजळे कामगार कल्याण अधिकारी, प्रवीण गायकवाड, अमित चव्हाण, बुगप्पा कोळी, सुमेधा सुपेकर, माधवी ताठे, चंद्रलेखा घडाळे, सुरेश दिघे, आदर्श गायकवाड, लोकेश लोहोट प्रभारी उपकामगार अधिकारी हे पुणे महानगरपालिकेत बोगस पद्धतीने व चुकीची कागदपत्रे देऊन लागलेले असून यांनी पदोन्नती ही भ्रष्टाचारी मार्गाने मिळवलेली आहे. त्यामुळे या सर्वांची तात्काळ चौकशी करून यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.  पुणे महानगरपालिकेमध्ये कामगार कल्याण विभाग कार्यान्वित आहे. या विभागाचे कामकाज हे सर्व सेवकांमधील संबंध हे सलोख्याचे रहावे व सर्वांना समान न्याय मिळावा, कुठल्याही कामगारांवर अन्याय होऊ नये हे काम आहे. तसेच कामगारांच्या बाबतीतले सर्व निर्णय कामगार विभागाकडे येतात. त्याचे नियोजन, नियंत्रण व निर्मिती हे काम या विभागाकडे आहे. तसेच बडतर्फ करणे, अगर शिस्तभंगाची व इतर स्वरूपातील कामे ही सुद्धा कामगार कल्याण विभ...

हुकूमशाही भाजपने छाटले लोकशाहीवादी नितीन गडकरी यांचे पंख!

हुकूमशाही भाजपने छाटले लोकशाहीवादी नितीन गडकरींचे पंख! लोकप्रिय गडकरीवरील सूडाच्या राजकारणाचा भाजपलाच फटका बसण्याची शक्यता! अलीकडच्या काळात भाजपाने “काँग्रेसमुक्त भारत” असा नारा देऊन सूडबुध्दीच्या राजकारणाला सुरूवात केल्याने याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत "आता राजकारण सोडून द्यावे असा विचार कधी कधी मनात येतो" असे वक्तव्य केले. त्यामुळे वर्णवर्चस्ववादी विचारांनी ग्रासलेल्या भाजपला त्यांचे हे लोकशाहीवादी विचार खटकल्याने हुकूमशाही भाजपने त्यांना संसदीय मंडळातून डावलून नितीन गडकरींचे पंख छाटले. मात्र आपल्या कर्तृत्वाने लोकप्रियतेच्या यशोशिखरावर पोचलेल्या गडकरीवरील सूडाच्या राजकारणाचा भविष्यात भाजपलाच फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  एकीकडे “लवकरच देशातले इतर पक्ष अस्ताला जातील, प्रादेशिक पक्षसुध्दा संपतील व केवळ भाजप हा एकमेव पक्ष देशात शिल्लक राहील” असे भाजपातील पक्षश्रेष्ठी वादग्रस्त विधान करीत आहेत. तर दुसरीकडे ना. नितीन गडकरी “लोकशाहीत विरोधी पक्षाला कमालीचे महत्त्व आहे. त्यामुळे ही व्यवस्था अधिक सुदृढ होण्यासाठी काँग्रेस...
इमेज
पांढरपेशी भिकारी गरजवंतांच्या मूळावर                  दुपारच्या दरम्यान मी नेहमीची वर्तमानपत्रे आणण्यासाठी अकलूजच्या एसटी स्टँडवर गेलो होतो. त्यावेळी मी एसटी स्टँडची पायरी चढताच माझ्यासमोर हातात घड्याळ, साधा मोबाईल व डोळ्यावर चष्मा घातलेला एक गृहस्थ हात जोडत पुढे आला. त्यानंतर तो म्हणाला की, "मला पिलीवमधील पाहुण्यांकडे जायचे असल्याने मी इंदापूरहून अकलूजला येत होतो, त्यावेळी माझे पैशाचे पाकीट पडले. तरी आपण मला निमगांवला जाण्यापुरते फक्त २० रूपयेच द्या." तेव्हा मला ही व्यक्ती खरंच अडचणीत आहे असं वाटून मी त्याला "बर ठीक आहे" असं म्हणून २० रूपये देण्यासाठी खिशातून पैसे काढताना त्याला ५० रूपयाची नोट दिसली. त्यावेळी त्याने "मी पेन्शनर आहे, तुम्ही मला ५० रूपये दिले तर मी तुम्हाला २ दिवसांनी इथे येऊन ५० रूपये परत करीन" असं म्हणाला. मात्र मी त्यास २० रूपयेच देऊन पेपर स्टॉलकडे निघालो आणि पेपर घेऊन एसटी स्टँडच्या बाहेर गाडीवर बसून निघालो. त्यावेळी तीच व्यक्ती आणखी एका व्यक्ती समोर हात जोडून उभी राहिलेली दिसली. तेव्हा पांढरपेशात वावरणार्या या भिकार...
इमेज
भंगार बसेस बनल्या प्रवाशांची डोकेदुखी               मी शनिवारी पुण्यातील कैलिडस मिडीया सेंटरमध्ये टीव्ही रिपोर्टींग व अँकरिंगच्या क्लासला गेलो होतो. या दरम्यान पुण्याला जाताना एसटी बसने प्रवास करीत होतो. मात्र बसमध्ये बसल्यानंतर खिडक्यांच्या धडधड करणाऱ्या आवाजाने अक्षरशः कानठळ्या बसत होत्या. एसटी महामंडळाचा प्रवास प्रवाशासाठी सुरक्षित असल्याने अनेक लोक खाजगी वाहनांपेक्षा एसटी बसनेच प्रवास करतात. परंतु महामंडळ अशा भंगार झालेल्या बसेसची योग्य काळजी घेत नसल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने जुन्या झालेल्या बसेस स्क्रैप करून प्रवाशांसाठी नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात. तरच एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढेल